Posts

बहुमान

रात्रीची वेळ तिचं आटपतच आलं होतं, आता दुधाला विरजण लावलं आणि गंज टेबला वर ठेवला की ती निजायलाच जाणार होती, एका कामाला हात न लावता  आटपलं की नाही तुझं? असं राजवाडे दोनदा विचारून गेले त्यानी आँनलाईन नवा मसाजर  मागावला होता खास तिच्या साठी तिला वाटलं होतं हे वाढदिवसाचं गिफ्ट असेल, पण नाही!वाढदिवसाची छान तिच्या आवडीची साडी मिळाली होती, पण हा मसाजर केवळ तिच्या काळजीपोटी मागवला होता हल्ली तिची पावलं खूप दुखायची, रात्री झोप लागायची नाही, आणि लागली तरी ती झोपेत कण्हायची नव्या नवलाईचे दिवस, त्यांचे नाही मसाजरचे दोन दिवस स्वत: करतील मग म्हणतील" तुला दाखवलं ना कसं करायचं ? मग आता तू कर. स्पीड कमी जास्त करता येतो, एका हाताने मसाजर धरयाचा आणि एका हाताने ही कळ फिरवायची तिला त्यांची वाक्यही माहीत झाली होती मुलंही आज काल  म्हणायची बाबा तुम्ही ठरल्या वेळी ठरल्या सारखे वागता ही हसली तरी असं काही बोलायची तिची  हिम्मत नव्हती साधी माणसं फार लवकर दुखावली जातात, असा तिचा अंदाज होता, त्यानी तिसर्‍यांदा बोलवायच्या आत आपण निजायला जायचं अशा विचारात असताना दारावरची बेल वाजली अशी अवेळ...

पंगत

बाबा गणपति घेअून आला आअी त्याच्या पायावर दूधपाणी घालायला अेक पाअूल बाहेर आली आणि वार्याने आपलं काम केलं धडामकन दार लागलं  गणपती सकट आअी बाबा घरा बाहेर आणि घरात सहा महीन्याची मनूडी आंघोळ अुरकून दुपट्या वर शांत निजलेली  दाराच्या आवाजाने ती दचकली आणि तिने टाहो फोडला  विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं तशी मनुडी खरच शहाणी होती पण कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती चौदाव्या मजल्यावर घर होतं. ब्रह्मांडाचा नायक हातात असताना दोघाना त्याचा विसर पडला दोघं फक्त मनुडीचा टाहो अैकत होते आअी तर रडायलाच लागली बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते रावणासारखी त्याची अवस्था झाली,शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते असं त्याने अैकलं होतं विषाची परीक्षा कोण घेणार? तुची माता तुची पिता तुची बंधू तुची सखा म्हणताना त्याच्याच बद्दल अितकी भिती भिती कसली? तर तो कोपेल याची क्षणात सगळं आठवलं घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न सगळ्यांशी तोडलेले संबंध दोघं दोघच जगताना कधी शेजारीही डोकाअून पाहील...

दुसरी आई

’माझी आई’हा विषय शाळेत असताना निबंधासाठी हमखास असायचा तर फार पूर्वी  एका दूर्गम भागातल्या  एका गावात एका शेतकर्‍याच्या मुलीने  माझी आई या विषयावर निबंध लिहायला घेतला त्या निबंधाचं पहिलं वाक्य काय होतं ? माझी आई सावत्र आहे मी दुसरीत असताना एका संध्याकाळी आत्या आणि बाबा तिला घरी घेऊन आले आत्यानी मला जवळ घेत सांगितलं "ही तुझी दुसरी आई" माझी पहिली आई मला आठवत नाही, कारण मी खूप छोटी होते तेंव्हा ती देवाघरी गेली माझ्या आज्जीनी मला मग सांभाळलं पण मग ती सुद्धा देवाकडे गेली माझी आज्जी मला नीट आठवते खूप प्रेमळ आणि मायाळू होती माझी आज्जी, माझ्या पहिल्या आईला आठवून सारखी डोळ्यातून टीपं गाळायची, आज्जीने डोळ्याला पदर लावला की बाबानाही गहिवरून यायचं पण ते रडायचे नाहीत आमच्या शेतात जाऊन गुरांसाठी वैरण कापत बसायचे नाहीतर सरपणासाठी लाकुडफाटा छाटायचे साधासा ताप आला आणि दवाखान्यात न्यायच्या आधीच माझी पहिली आई गेली असे शेजारचे सांगायचे दुसरी आई ही माझी सावत्र आई आहे हे त्यानीच मला सांगितलं सावत्र आई चांगली नसते दुष्ट असते असही त्यानी मला सांगून ठेवलं  होतं रात्री निजताना सावध रहा नाहीतर ...

गुंता

 एक मस्तवाल  व्याभिचारी इसम होता! गोष्टीची सुरुवात कशी वाटते ना? पण ही गोष्ट त्याच्यामुळेच सुरू झाली, व्याभिचारी असण्यावर त्याला फार मिजास वाटायची, त्याचं व्यक्तिमत्व होतही तसच , जरा सैलावलेली कोणीही बाई त्याला भुलायची पण अशा नवर्‍याची बायको महा खमकी, एखादी असती तर सोडून गेली असती पण ही म्हणायची "याला मनमानी करायला सोडू? मग तर काय ह वळू जिथे तिथे तोंड मारेल, त्याची तर काय मज्जाच मग म्हणून त्याला न सोडता ती कायम त्याच्या पाळतीवर असायची. त्या एरियात ही जोडी फेमस होती त्याच्या बायकोला वैनी हाक मारणारे खूप होते. आणि याची खबर पुरवणारेही खूप होते. हा मस्तवाल असला तरी बायकोला वचकून असायचा कारण तिचे पप्पा आणि मोठा भाऊ पोलिसात होते एक रात्र कस्टडीत त्यानी घालवली होती, फटके खाल्ले होते त्यामुळे आपण सुधारल्याची नाटकं त्याला वारंवार करावी ्लागायची पण कुत्र्याचं शेपूट, सरळ होऊन होऊन किती होणार?त्याने आपला एरिया सोडून इतरत्र आपली नजर फिरवायला सुरुवात केली मग तसा त्याचा वावरही त्या त्या एरियात वाढायला लागला बायको पाळतीवर होतीच ती चुकीची का बरोबर? हा प्रश्न वेगळाकारण इरीस पडल्यावर  ...

उपवर

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पहात राहीलं तर खरच खूप काही खास होतं , खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्या सारखे रेखीव डोळे, ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं , केस पातळ पण सिल्की सरळ , मधे भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत त्यात चांदीची नक्षीदार क्लीप तिच्या बरोबर तिचे तीन मोठे भाऊ आणि आई आली होती. भाऊ सांगत होते "चाहे तो सो रुप्पैय्या जादा लो पर इसे गोरा दिखाओ" हे सांगणारे स्वत: काळे मिचकुट होते, पण ते पुरुष होते. निव्वळ हिच्यामुळे त्यांचं लग्न आडत होतं आई म्हणत होती" जब देखो रोनी सुरत लेकर बैठती हैं" जबतक ठीक से हसेगी नही तब तक फोटॊ मत निकालना बागेत सापडलेलं पोपटाचं बाव...

उपजत

एक गाव आहे तिथे म्हणे बहुतेक घरात सगळी जुळीच जन्माला येतात. तिथे जुळ्याचं अप्रूपच नाही तसं महाजन नगरात सगळी बैठी घरं जुळी .दोन घराना मिळून चारही बाजूनी सलग ऐसपैस चौथरा आणि चौथर्‍यावर चढायला चार चार पायर्‍या मधोमध दोन जुळी दारं , एका रेषेत चार खोल्या शेवटी स्वैपाक घर स्वैपाकघराला देखील दारं अगदी दोन्ही घरं जरी कुणाच्या मालकीची असली तरी बाह्य आकार बदलायची परवांगी नाही पण दोन्ही घरं मालकिची असणारे फार क्वचीत बाकी सगळे सर्वसामान्य आपला संसार एका घरात मांडणारे. बहुतेक घरात दृष्ट लागेल असा घरोबा महाजन नगरात एकमेकाना घराच्या नंबरवरून ओळाखायची पद्धत, आज सी टू वाल्यांकडे पुजा आहे डी फोर वाल्यांच्या मुलीचं लग्न ठरलं , अशी साधारण बोलायची पद्धत. पण त्यात जास्त उठून दिसायचा  तो बी नाईन मधला घरोबा यशोदा आणि रघुवीर पोळ आणि श्यामला आणि दिगंबर राव या घराचा घरोबा घरोबा म्हणजे घनीष्ट मैत्री शनिवार रविवार बहुतेक घरात सुट्टी असायची तर समस्त महाजन नगराचं  बी नाईन वर लक्ष असायचं , हा वीकएंड दोन्ही घरं कसा साजरा करतायत? फक्त वीकएंडच नाही तर  प्रत्येक सण उत्सव अगदी विनाकारण होणारा आनंद सुद्धा बी ...

कोडगा

"कोडगा" या शब्दाला समानार्थी शब्द खूप असतील, आहेतच! पण मुळात या शब्दाचा जो अर्थ आहे तो भयंकर आहे ज्याला कोडगं म्हंटलं जातं त्याला एका अर्थी वाळीतच टाकलं जातं , ज्याने हे अनुभवलं असेल त्याला मी काय म्हणतोय ते बरोबर कळेल आणि ज्यानी हे अनुभवलं नसेल तो माझ्यामते खरा भाग्यवान रामाच्या कृपेनं असं भाग्य  जन्माला येणार्‍या प्रत्येकाला मिळो, पण तसं होत नाही निदान या आपल्या कथेच्या नायकाच्या नशिबी तरी हे भाग्य नव्हतं भालू दामोदर दरडे, वय वर्ष बत्तीस भावंडात शेंडेफळ दिसायला देखणा, उंचा पुरा, सावळा पिळदार अंगाचा मोठी पाच भावंड तीन बहिणी दोन भाऊ, सगळे विवाहीत संसाराला लागलेले याचा संसाराचा प्रश्नच नव्हता कारण कमावता नाही तर लग्न कसं होणार? बारावी पास त्यानंतर शिक्षण झेपेचना, वडील निवृत्त झाले भावानी हात वर केले, बहिणी काय बोलून चालून सासुरवाशीणी तरी बहिणींचा तसा जिव तुटायचा, मधल्या भावोजींचा तर भालूवर जिवच होता तसा एका वहिनीचाही जिव होता त्याच्यावर,जिव होता की डोळा? पण भालू मुळात वृत्तीने सज्जन, तिने किती इशारे केले तरी हा कानाडोळा करायचा जपून राह्यचा आणि भालूचा एकटेपणा समजून...