Posts

राणूबाई

गौरीचे लांबसडक जाडजूड केस, दाट असे की कंगवा शिरणं मुष्कील कंगवा घेताना तिच्या केसात जाईल असाच कंगवा निवडावा लागायचा, वेणीचे पेड मोजले तर चाळीसच्या वर जायचे, तिच्या लहानपणी कोणी तिच्या वेणीचे पेड मोजायला लागले की आज्जी पाठीत धपाटा घालायची आणि लग बगीने थू थू करायची, म्हणजे थुकल्याचं नाटक मग गौरी मोठी झाली तसे तिचे केसही लांब सडक झाले म्हणजे खरच चालताना सडक झाडण्याचच बाकी होतं मग तिने प्रिंटींग टेक्नाँलाँजी मधे करियर करायला घेतलं त्यातच ती बिझी झाली सकाळी घर सोडायची ते रात्रीच उगवायची, आई आज्जी डोक्यावर बसायच्या म्हणून चार घास जेवायची इतकी दमलेली असायची की कधी कधी आई म्हणायची "जा हात धू जा, नीट चूळ भर आणि झोपून टाक, बाकीचं मी आवरते यावर सुटका झाल्याचा आनंद दाखवत ती नेहमीचं वाक्य बोलायचीच आई पाचचा गजर लाव, मला लवकर जायचय" तर , अशी ही मुलगी लग्न करून सून म्हणून आमच्या विभाच्या घरी आली विभाचा एकुलता एक मुलगा आधी लग्नाला तयारच नव्हता, पण गौरीला बघितलं भेटला बोलला आणि तिच्या विषयीच बोलत राहिला विभाला अप्रूप होतं ते तिच्या मोहक हसण्याचं आणि लांबसडक केसांचं आली की सारखं त्या विषयीच बो...

ओळ्खीची मामी

माझी एक ओळखिची मामी होती नात्यापेक्षाही जवळची खूप सात्वीक तितकीच दूर्दैवी, तिला घरात मानच नव्हता खरं तर घरची मोठी सून पण धाकट्या जावा जास्त स्मार्ट निघाल्या , आम्ही त्यानाही मामीच हाक मारायचो पण हिला मात्र मामी मानायचो एक तरणा मुलगा खंगत खंगत गेला आणि मोठा मुलगा विचारत नव्हता तसं कोणीच विचारत नव्हतं त्यात हा एक मामीला सून मिळाली ती पण हुशार तिने दोन दिवसात आपल्या सासूला जोखलं  पण तिची योग्यता नाही ओळ्खली श्रीधर स्वामींची निस्सीम भक्त होती मामी, त्यात द्न्यानेश्वरीवर श्रद्धा जडली, मग काय घरातल्या शुद्र राजकारणात तिचं म्न रमलच नाही मग कसले मान अपमान घरचे काबाड कष्ट उरकून ती दत्ताच्या देवळात जाऊन बसायची लेकीसुनानी भरलेलं घर पण वेळेला कधी कधी एक रुपया नसयाचा तिच्याकडे मधे पाय मोडला, त्याकडेही तसं दूर्ल्क्षच झालं  म्हणजे दूर्लक्ष केलं  त्यामुळे कायम लंगडेपण आलं  तरी ओट्याजवळची कामं झाली की बाथरूम मधे एक पाय पसरून बसत ती चार बादल्या कपडे धुवायची संसारातून विरक्त होणं वेगळं आणि संसारातून अंग काढून घेणं वेगळं  तर तिच्या सुनेने संसारातून अंग काढून घेतलं होतं  सण वार...

बहुमान

रात्रीची वेळ तिचं आटपतच आलं होतं, आता दुधाला विरजण लावलं आणि गंज टेबला वर ठेवला की ती निजायलाच जाणार होती, एका कामाला हात न लावता  आटपलं की नाही तुझं? असं राजवाडे दोनदा विचारून गेले त्यानी आँनलाईन नवा मसाजर  मागावला होता खास तिच्या साठी तिला वाटलं होतं हे वाढदिवसाचं गिफ्ट असेल, पण नाही!वाढदिवसाची छान तिच्या आवडीची साडी मिळाली होती, पण हा मसाजर केवळ तिच्या काळजीपोटी मागवला होता हल्ली तिची पावलं खूप दुखायची, रात्री झोप लागायची नाही, आणि लागली तरी ती झोपेत कण्हायची नव्या नवलाईचे दिवस, त्यांचे नाही मसाजरचे दोन दिवस स्वत: करतील मग म्हणतील" तुला दाखवलं ना कसं करायचं ? मग आता तू कर. स्पीड कमी जास्त करता येतो, एका हाताने मसाजर धरयाचा आणि एका हाताने ही कळ फिरवायची तिला त्यांची वाक्यही माहीत झाली होती मुलंही आज काल  म्हणायची बाबा तुम्ही ठरल्या वेळी ठरल्या सारखे वागता ही हसली तरी असं काही बोलायची तिची  हिम्मत नव्हती साधी माणसं फार लवकर दुखावली जातात, असा तिचा अंदाज होता, त्यानी तिसर्‍यांदा बोलवायच्या आत आपण निजायला जायचं अशा विचारात असताना दारावरची बेल वाजली अशी अवेळ...

पंगत

बाबा गणपति घेअून आला आअी त्याच्या पायावर दूधपाणी घालायला अेक पाअूल बाहेर आली आणि वार्याने आपलं काम केलं धडामकन दार लागलं  गणपती सकट आअी बाबा घरा बाहेर आणि घरात सहा महीन्याची मनूडी आंघोळ अुरकून दुपट्या वर शांत निजलेली  दाराच्या आवाजाने ती दचकली आणि तिने टाहो फोडला  विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं तशी मनुडी खरच शहाणी होती पण कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती चौदाव्या मजल्यावर घर होतं. ब्रह्मांडाचा नायक हातात असताना दोघाना त्याचा विसर पडला दोघं फक्त मनुडीचा टाहो अैकत होते आअी तर रडायलाच लागली बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते रावणासारखी त्याची अवस्था झाली,शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते असं त्याने अैकलं होतं विषाची परीक्षा कोण घेणार? तुची माता तुची पिता तुची बंधू तुची सखा म्हणताना त्याच्याच बद्दल अितकी भिती भिती कसली? तर तो कोपेल याची क्षणात सगळं आठवलं घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न सगळ्यांशी तोडलेले संबंध दोघं दोघच जगताना कधी शेजारीही डोकाअून पाहील...

दुसरी आई

’माझी आई’हा विषय शाळेत असताना निबंधासाठी हमखास असायचा तर फार पूर्वी  एका दूर्गम भागातल्या  एका गावात एका शेतकर्‍याच्या मुलीने  माझी आई या विषयावर निबंध लिहायला घेतला त्या निबंधाचं पहिलं वाक्य काय होतं ? माझी आई सावत्र आहे मी दुसरीत असताना एका संध्याकाळी आत्या आणि बाबा तिला घरी घेऊन आले आत्यानी मला जवळ घेत सांगितलं "ही तुझी दुसरी आई" माझी पहिली आई मला आठवत नाही, कारण मी खूप छोटी होते तेंव्हा ती देवाघरी गेली माझ्या आज्जीनी मला मग सांभाळलं पण मग ती सुद्धा देवाकडे गेली माझी आज्जी मला नीट आठवते खूप प्रेमळ आणि मायाळू होती माझी आज्जी, माझ्या पहिल्या आईला आठवून सारखी डोळ्यातून टीपं गाळायची, आज्जीने डोळ्याला पदर लावला की बाबानाही गहिवरून यायचं पण ते रडायचे नाहीत आमच्या शेतात जाऊन गुरांसाठी वैरण कापत बसायचे नाहीतर सरपणासाठी लाकुडफाटा छाटायचे साधासा ताप आला आणि दवाखान्यात न्यायच्या आधीच माझी पहिली आई गेली असे शेजारचे सांगायचे दुसरी आई ही माझी सावत्र आई आहे हे त्यानीच मला सांगितलं सावत्र आई चांगली नसते दुष्ट असते असही त्यानी मला सांगून ठेवलं  होतं रात्री निजताना सावध रहा नाहीतर ...

गुंता

 एक मस्तवाल  व्याभिचारी इसम होता! गोष्टीची सुरुवात कशी वाटते ना? पण ही गोष्ट त्याच्यामुळेच सुरू झाली, व्याभिचारी असण्यावर त्याला फार मिजास वाटायची, त्याचं व्यक्तिमत्व होतही तसच , जरा सैलावलेली कोणीही बाई त्याला भुलायची पण अशा नवर्‍याची बायको महा खमकी, एखादी असती तर सोडून गेली असती पण ही म्हणायची "याला मनमानी करायला सोडू? मग तर काय ह वळू जिथे तिथे तोंड मारेल, त्याची तर काय मज्जाच मग म्हणून त्याला न सोडता ती कायम त्याच्या पाळतीवर असायची. त्या एरियात ही जोडी फेमस होती त्याच्या बायकोला वैनी हाक मारणारे खूप होते. आणि याची खबर पुरवणारेही खूप होते. हा मस्तवाल असला तरी बायकोला वचकून असायचा कारण तिचे पप्पा आणि मोठा भाऊ पोलिसात होते एक रात्र कस्टडीत त्यानी घालवली होती, फटके खाल्ले होते त्यामुळे आपण सुधारल्याची नाटकं त्याला वारंवार करावी ्लागायची पण कुत्र्याचं शेपूट, सरळ होऊन होऊन किती होणार?त्याने आपला एरिया सोडून इतरत्र आपली नजर फिरवायला सुरुवात केली मग तसा त्याचा वावरही त्या त्या एरियात वाढायला लागला बायको पाळतीवर होतीच ती चुकीची का बरोबर? हा प्रश्न वेगळाकारण इरीस पडल्यावर  ...

उपवर

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पहात राहीलं तर खरच खूप काही खास होतं , खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्या सारखे रेखीव डोळे, ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं , केस पातळ पण सिल्की सरळ , मधे भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत त्यात चांदीची नक्षीदार क्लीप तिच्या बरोबर तिचे तीन मोठे भाऊ आणि आई आली होती. भाऊ सांगत होते "चाहे तो सो रुप्पैय्या जादा लो पर इसे गोरा दिखाओ" हे सांगणारे स्वत: काळे मिचकुट होते, पण ते पुरुष होते. निव्वळ हिच्यामुळे त्यांचं लग्न आडत होतं आई म्हणत होती" जब देखो रोनी सुरत लेकर बैठती हैं" जबतक ठीक से हसेगी नही तब तक फोटॊ मत निकालना बागेत सापडलेलं पोपटाचं बाव...