सराईत
घराचा उंबरठा एकदा ओलांडला की सतरा उंबरठे ओलांडवे लागतात, माझंही तसच झालं, माईकडॆ सुरक्षीत होतो पण तिथनं दैवयोगाने बाहेर पडावं लागलं आणि मग मजल दर मजल करत मी बारामतीकरांच्या अटोपशीर घराशी पोहोचलो.घरात स्थान नव्हतं पण राहण्यापुर्ती जागा होती, राहायची सोय बजेट परवडाणारं होतं पण काही अटी जाचक होत्या त्यात महत्वाची अट म्हणजे काम असो वा नसो दुपारी बारा ते पाच घराबाहेरच राहायचं त्याला रविवारही अपवाद नाही,मुबंई बंद, खग्रास सूर्यग्रहण,धो धो पाऊस यातलं काही असलं तरी..तेंव्हा माझं कामही भटकंतीचं होतं माँडेल को आर्डीनेशन म्हणजे सतत संपर्कात राहावं लागायचं त्याकरता फिरावं लागायचं, चपला झिजवाव्या लागायच्या,डॊकं भिरभिरायचं त्यात बारामतीकरांकडे आणखी एक जाचक अट होती मला फोन फक्त सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सातच घेता यायचे एरव्ही निरोप सुद्धा त्यांची मर्जी असेल मूड असेल तर घेतले जायचे.त्यांच्या घरात मी सात महिने राहिलो पण तरी ते कुटूंब मला पुर्णपणे अनोळखीच राहिलं तीन टगे निकम्मे मुलगे एक थोराड मुलगी, एक अधाशी कुत्रा दोन नोकर आणि सतत हिशोबात गढलेल्या त्या बारामतीकर बाई,आणि त्या...