Posts

कोडगा

"कोडगा" या शब्दाला समानार्थी शब्द खूप असतील, आहेतच! पण मुळात या शब्दाचा जो अर्थ आहे तो भयंकर आहे ज्याला कोडगं म्हंटलं जातं त्याला एका अर्थी वाळीतच टाकलं जातं , ज्याने हे अनुभवलं असेल त्याला मी काय म्हणतोय ते बरोबर कळेल आणि ज्यानी हे अनुभवलं नसेल तो माझ्यामते खरा भाग्यवान रामाच्या कृपेनं असं भाग्य  जन्माला येणार्‍या प्रत्येकाला मिळो, पण तसं होत नाही निदान या आपल्या कथेच्या नायकाच्या नशिबी तरी हे भाग्य नव्हतं भालू दामोदर दरडे, वय वर्ष बत्तीस भावंडात शेंडेफळ दिसायला देखणा, उंचा पुरा, सावळा पिळदार अंगाचा मोठी पाच भावंड तीन बहिणी दोन भाऊ, सगळे विवाहीत संसाराला लागलेले याचा संसाराचा प्रश्नच नव्हता कारण कमावता नाही तर लग्न कसं होणार? बारावी पास त्यानंतर शिक्षण झेपेचना, वडील निवृत्त झाले भावानी हात वर केले, बहिणी काय बोलून चालून सासुरवाशीणी तरी बहिणींचा तसा जिव तुटायचा, मधल्या भावोजींचा तर भालूवर जिवच होता तसा एका वहिनीचाही जिव होता त्याच्यावर,जिव होता की डोळा? पण भालू मुळात वृत्तीने सज्जन, तिने किती इशारे केले तरी हा कानाडोळा करायचा जपून राह्यचा आणि भालूचा एकटेपणा समजून...

मुरलीधर

विश्राम बोरगावकर वय वर्ष चाळीस सज्जन साधे सरळ संसारी गृहस्थ आयुष्य म्हणाल तर, साधं सरळ सोपं , आयुष्यात कोणतीच गोष्ट त्यानी ठरवून केली नाही, अगदी लग्न सुद्धा त्यांच्या चुलत्यानी ठरवलं आणि हे बोहल्यावर उभे राहिले आंतरपाठापलिकडॆ कोण उभी असेल हे त्यानी धड बघितलंही नव्हतं , पण कोणीतरी ठरवल्याप्रमाणे आंतरपाठा पलिकडे उभी असलेली वसूंधरा अगदी त्याना अनुरूप अशीच होती एकूणच आयुष्य सुखी माणसाचं असावं तसं होतं नोकरीही सोयीची होती, आँफीसातही कसला त्रास नव्हता वसूंधरा अबोल असली तरी हसतमूख होती, तिचाही शिलाईच्या कामावर हात बसला होता घर बसल्या ती ही चार काय दहा पैसे कमवत होती यथावकाश दोन मुलं झाली, ती ही तशी गुणीच आता दंगा त्यानी नाही करायचा तर कोणी करायचा? त्यांचं वयच आहे ते , वसूंधरा समंजस होती शक्यतो मुलांचे प्रश्न ती आपल्या  साध्या सरळ नवरोजी पर्यंत येऊच द्ययची नाही . तरी सध्या विश्राम या आयुष्याच्या साध्या सरळ सोप्या प्रवासाला काहिसा उबले होते त्याना एखादी गोष्ट स्वत:ठरवून करायची होती तसं त्यानी आपल्या बायकोला सांगितलं , मला आता एक असं काहीतरी स्वत: ठरवून पार पाडायचय वसूंधरा म्हण...

निरोप समारंभ

आम्ही बहुतेक घरं बदलली ती साधारण याच दिवसात पाऊस सुरू झालेला असायचा किंवा सुरू होण्याच्या बेतात असायचा, कधी मोजकं सामान असायचं तर कधी जास्त पण सगळ्यात जड काय जात असेल तर तिथल्या शेजार्‍यांचा निरोप घेणं घर बदलताना प्रत्येक ठिकाणी निरोपसमारंभ ठरलेला असायचा, भेटींची देवाण घेवाण व्हायची, येत जात रहा अशी आळवणी असायची या बाबतीत आम्ही  कायम नशिबवान ठरलो , घरं छान मिळालीच पण प्रत्येकवेळी शेजारीही अगदी घरोब्याचे मिळाले अजूनही त्यातील बहुतेकांशी आमचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत लग्न मुंजी बारशी सगळ्याची आम्हाला निमंत्रणं असतात आणि आम्हीही आवर्जून हजेरी लावतो, नुसती हजेरी नाहीतर त्या समारंभाच्या धावपळीत सहभागी होतो सहभागी होण्यावरनं आठवलं आम्ही सर्वोदय मधे राहयला आलो तेंव्हाचा निरोप समारंभ आमचे सर्वोदय मधले दिसव खरच फार सुखाचे होते त्या तीन वर्षात एकदाही मला सकाळी उठून दूध आणायला केंद्रावर जावं लागलं नाही कारण शेजारच्या उसाळकर वहिनी केंद्रावर काम करायच्या तर येताना दूध घरपोच देऊन यायच्या खालच्या मजल्यावर भोंडे म्हणून राहयचे त्यांचं डिपार्टमेंट लक्षात नाही पण ताजा बाजार त्याना मिळायचा आम्ही ग...

प्रश्न

काही प्रश्न कितीही वाटलं तरी नाही विचारता येत ते तसेच राहतात  मनात सुचिताचं तसं झालं होतं गौतमशी तीस वर्ष सुखाचा संसार करूनही ती त्याला कधी विचारू शकली नव्हती, तुम्ही मला पसंत कसं केलत"? हे खरच होतंं सुरुवातीला गौतम बरोबर सुचिताला बघितलं की बघणार्‍याच्या मनात हा प्रश्न डोकावायचाच गौतम सारख्या उमद्या उच्च शिक्षीत मुलाने सुचिताला कसं काय पसंत केलं ? गौतम दिसायला देखणा, तरणाबांड गडी, शिक्षणातही अव्वल नाकेला असून दाताला खळी असलेला, मनापासून हसला की डावा डोळा जरा बारीक व्हायचा आणि तसा तो कायम मनापासूनच हसायचा आणि त्याचं श्रेय सुचितालाच जातं कारण तिने गौतमला फार सुखात ठेवलं अर्थात सुचिताच्या सुखासाठी सुरुवातीला गौतमलाही एक कठोर निर्णय घ्यावा लागला होता , आणि त्याने तो वेळ ओळखून घेतला , तो घरापासून नं भांडता , वादात न पडता वेगळा झाला खरं सांगायचं तर घरापासनं तसा तो वेगळाच होता महत्वाकांक्षी आई आणि  सतत वैतागलेले वडील, वार्‍याला पाठ दाखवत सतत बचावाचा पवित्रा घेणारा धाकटा भाऊ, अविवाहीत असलेले आणि वेळोवेळी मधे नाक खुपसणारे मोठे चुलते यांच्या सोबत त्याने बालपण काढलं होतं , घरातल्या प्रत्...

लाकुडतोड्याची गोष्ट

काही गोष्टी कोणी नं ठरवता ठरून जातात आणि मग ठरल्याप्रमाणे घडत राहतात, कधी ठरवलं कोणी ठरवलं हे असले प्रश्र्न मग उरतच नाहीत जसं आई अनंताची लाखोली तेंव्हा  पार्लेश्वराला वाहयची त्यावेळी पिशवी पिशवी फुलं तुपे वहिनी घेऊन यायच्या छायाताई एकशे सोळा फुलं आहेत हो, सदुशष्ट फुलं मिळाली, या कळ्या आहेत उमलतील उद्याच्याला , जरा मोजून घ्या  हे असे संवाद अजून माझ्या कानात घुमतात त्यावेळी आमच्या इथे रानंच्या रानं माजलेली असायची अनंत चाफा प्राजक्त जांभूळ नागचाफा बकूळ किती झाडं सांगू? मग आमच्या आईचा नेम ठरलेला कधी प्राजक्ताची नाहीतर कधी अनंताची तगारीची लाखोली आई पार्लेश्वराला वहायची लाखोली वाहणं म्हणजे लाख लाख फुलं चातुर्मासात चातुर्मास पूर्ण व्हायच्या आत शंकराच्या पिंडीवर वाहणं , बेलीची लाखोली वाहणारे बरेच्जण असायचे गुंजा वाहणारे सुद्धा कोण कोण असायचे त्यावेळी गुंजेची गोमटी झाडं सुद्धा खूप होती आमच्या भोवती ,  एक गाव देवी होती तिचं नाव नीट आठवत नाही पण तिला करंज्याचा हजारा वाहयला जायचा , करंजा  म्हणजे करंजी नव्हे करंज्याचं हिरवगार तजेलदार झाड असायचं त्याला कडू जहार औषधी फळं लागा...

परंपरा

आमची शालमली आहे ना , तिच्या सासरी पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे मुलगी मोठी झाली की तिला एकटीला  दिवा घेऊन चैत्र गौरीला  गाव देवीच्या देवळात पाठवतात ते ही तिन्हिसांजेला आता ही त्या काळातली गावा गावात रुढ झालेली परंपरा त्यावेळी मुलगी मोठी होण्याचा अर्थही वेगळा होता , वातावरणही त्याला पोषक होतं गावं साधी त्याहून तिथली माणसं साधी तिन्हिसांजेला कोणी मुलगी एकटी नटून थटून दिवा घेऊन देवळाकडे निघाली की सगळ्याना समजायचं अमूक अमूक मुलगी उपवर झाली , मग कोणाचे कान टवकारायचे तर कोणाचे डोळे बारीक व्हायचे विचारणा व्हायची मग दर मौसमात चार दोन कार्य ठरायची त्याकाळी पंचक्रोशीतच स्थळं बघायची पद्धत, एकमेकाचं एकमेकाला माहीत असायचं कुणाकडे पूर्वापार चालत आलेलं वेड आहे, कुणी दाखवत असलं तरी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती कशी आहे कुणाचा मुलगा काय करतो आणि मुलगी गुणाने कशी आहे त्यामुळे पूर्वापार परंपरा असली , दरवर्षी नेमाने होत असली तरी त्यातला नवेपणा  कायम ताजा पण आता काळ बदलला विचार बदलले थोडक्यात माणसं बदलली पण मनातली श्रद्धा आहे ती नाही बदलत , खास करून आपल्या मुलाबाळांच्या बाबती...

सो साल की एक बात

भिडे मास्तर दुपारची नीजानीज होण्याची वाट बघत  त्यांच्या चाळीच्या व्हरांड्यात अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होते. आज  व्हरांड्यात बसायला त्यांची हक्काची आराम खुर्ची नव्हती हे खरं की आरामखुर्ची खूप जुनी झाली होती त्याला डागडुजीची गरज होती, घरात बाकीचे व्यवहार पार पडत होते मिक्सर बिघडला तर नवा आणायला जमत होता भिंतीला चिकटून बसणारा चपटा टी व्ही मुलांची हौस म्हणून हप्त्यावर का होईना पण आणायला सवड होती पण भिडॆ मास्त्रांची खुर्ची दुरुस्त करायला सवड नव्हती आणि  मग काय खुर्ची काढायला त्यांच्या लेकाला कारणच मिळालं मधे एकदा दुपारची वामकुक्षी घेताना ते खुर्चीतून कलंडले ते त्यांच्या खांद्याला थोडी दुखापत झाली आणि मुलाच्या डोक्याला त्रास मग उपचार आले लाईट्स घेणं आलं चाळीतलं बिर्हाड, दार उघदं तसं व्यवहार उघडे मग काय सतराशेसाठ सल्ले, भिडे मास्तरांचं काही इतकं वय झालं नव्हतं पण  माईच्या आजाराने ते खचले होते निवृत्त झाल्यावर बर्‍यापैकी पेंशन हातात येत होतं पण सगळं माईच्या आजारपणावर जात होतं पटत नसताना भिक्षुकी करावी लागत होती सत्यनारायणाची पुजा त्याना अजिबात पटत नव्हती त्याची पोथी वाचतान...