आंगण वाकडं
नाचता येईना आंगण वाकडं अशी एक म्हण आहे
पण धामण गावात राहणार्या सरूबाईच्या चंद्रमौळी घराचं आंगण खरच वाकडं म्हणजे उताराला लागलेलं होतं
सरूबाई त्या वाकड्या आंगणात बेभान होऊन नाचायची, कुठली कुठली लोकगीतं , पारंपारीक गीतं तिला त्यावेळी आठवायची, कुठला ताल आणि कुथले सुर ती शोधायची ते तिचं तिला माहीत
नाचताना आपण कसे दिसतो हे बघायला तिच्या घरी आरसाही नव्हता, पण तरी ती जरा सवड मिळाली की नाचायची आणि त्यावरून माय बापाच्या शिव्या खायची.. वंगाल लकशान इतकाच ताशेरा ते मारायचे
धामण डोंगर दर्यात विसावलेलं छोटसं गाव
अगदी मुठभर लोकसंख्या असलेलं , शहरी लोकांसाठी निसर्गरम्य,
नाहीतर तिथल्या लोकांच्या अडचणी समस्या त्याना माहीत, काबाडकष्ट आणि दारिद्र्य तर जन्माला पुरलेलं
कडे कपारी असल्यामुळे दिवस लवकर मावळायचा
चढ उतार असे की भले भले जेरीस यायचे
राजकिय लोकानी त्याला दुर्गम प्रदेश म्हणून अनेक योजना राबवल्या ज्या धामण पर्यंत पोहोचल्याच नाहीत
धामण गावापासून उतरायला लागलं की दोन तीन फर्लांगावर धामण नदी लागायची
भर पावसात दुथडी भरून वाहणारी नदी बाकीचे दिवस झूळू झुळू वाहती असायची
भारी मधुर पाणी होतं त्या नदीचं
शहरी प्रदुशणाचा स्पर्श त्या पाण्याला झाला नव्हता, कुठेही थांबावं आणि ओंजळीत पाणी घेऊन पोट भरावं शहरी शीतपेयं झक मारली अशी चव होती त्या झुळू झुळू वाहणार्या पाण्याला
त्या पाण्यावरच तर हे मुठभर लोकांच आडगाव टिकून होतं
त्या गावची रीतच होती पाणी भरायला गावच्या मुलीबाळीच नदीवर यायच्या
तोच त्यांचा टाईपसही असायचा
अगदी पाण्यात डुंबण्याइतकं पाणी नेहमीच नसायचं
पण तरूण देह चिंब करण्याइतकं पाणी नक्कीच असायचं , बर्यापैकी एकांत असायचा
सगळ्या मुली मुलीच अशायच्या मुलं शेतावर राबत असायची
एकजात सगळे वरीचं नाहीतर कुळथाचं पिक घ्यायचे
सोबतीला ससे तीतर मिळाले तर जेवताना मेजवानी
मुली पाणी भरायला आल्या की बरेचदा सरूबाईला नाचायला सांगायच्या
ती खरी कलाकार होती
तिलाही समोर प्रेक्षक लागायचे, त्यांची दाद लागायची
सगळ्या टाळ्या नाहीतर मडकी वाजवून ताल धरायच्या आणि नवे नवे ठुमके शोधत सरूबाई यथेच्छ नाचून घ्यायची, तितकाच तिचा सरावही व्हायचा
घरी शिव्या पडायच्या, वेळ प्रसंगी आईचे धपाटेही बाप मधे पडायचा म्हणून सरूबाईचा मार वाचायचा
पण इथे सख्यांची कौतोकाची थाप पडायची
सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जायचा
परत रानावनाची आडवाट चढताना तिला शीण जाणवायचा नाही
पण एकदा मैत्रीणींच्या शाबसकी सोबत एका परदेसी बाबूची उस्फुर्त वाहवा ऐकायला आली
सगळ्याच मुली बावचळल्या
कोण कुठे शोधण्यापेक्षा त्यानी गावची वाट चढायला सुरुवात केली
कुणाची घागर भरलेली कुणाची तशीच
परदेशी लोकांची भिती तशीच पुर्वापार त्यांच्या मनात ठसव्लेली
जंगली जनावर परवडलं ते एकदाच फाडून खातं पण हे शहरी लोक लचके तोडत अर्धमेलं करतात अशा अर्थाची म्हण त्यांच्या गावात बोलली जायची
बाकी मैत्रीणींसोबत सरूबाईलाही पळावं लागलं
पण ती अनोळखी आवाजातली मधूर वाहवा तिच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली
ते कानात मनात सतत घुमत राहिली धस्स करत राहिली
आता दोन तीन दिवस नदीवर न जाण्याचा निर्णय मैत्रीणीनी घेतला जो तिला नाईलाजाने मान्य करावा लागला
पण तिच्या मनाला तो मान्य नव्हता
दोन दिवस तिने कसे बसे मनाशी झुंज देत काढलेपण तिसर्या दिवशी तिच्या मनानेच तोडगा काढला
निर्णय दिवसा न जाण्याचा होता
आपण रात्री जाऊ, तिच्या निर्णयावर तिच ठाम झाली
आणि नेमकी पुनवेच्या रात्री तिने नदीची निसरडी वाट उतरायला सुरुवात केली
चंद्राचा धवल टिपूर प्रकाश पडला होता, इतका की पाना फुलांच्या सावल्या ठळक झाल्या होत्या
वातावरणात गारवा होता
रानफुलांचा मादक सुगंध सर्वत्र भरून राहिला होता
रात्रीच्या निरव शांततेत नदीचा झुळू झुळू वाहणारा प्रवाह एक वेगळाच नाद धरून होता
पुनवेच्या रात्री गावची देवी सख्यांसह नदीवर स्नानाला येते अशी अख्यायिका होती
बघा! गावदेवी सुद्धा रात्रीची नदीवर एकटं यायचं धाडस करत नव्हती
पण सरूबाईला उन्मादच चढला होता
ती नदीवर आली वाहत्या पाण्यात तिने आपले पाय बुचकळले
त्या आवजाने हरणाची जोडी सावध झाली, मोराने मान उंचावून अंदाज घेतले, लांडोरी सावध झाल्या
तितराचा कळप भरारा उडून थोड्या अंतरावर जाऊन बसला
आणि हिने आपलं नृत्य सुरू केलं
त्या बरोबर बासरीचे सूर वातावरणात भरले ओसांडले दूरवर वाहिले इतके की गावात पोहोचले
ती नाचत होती तो शहरी बाबू बासरी वाजवत होता
तो चित्रकार होता तो छायाचित्रकार होता तो दिगदर्शक होता
आणि त्याआधी तो रसिक होता
आस्थे कदम कळत नकळत दोघं अवचित समोरा समोर आले
त्याचे सुर तिची खनक एकमेकाला भिडली
मग काय, दोघे भेटायला लागले कधी भाबळीच्या रानात तर कधी बोरीच्या घाटात
पुनवेला बासरीचे सुर घुमले म्हणजे शुभ संकेत म्हणून गावदेवीच्या देवळात पुजा ठेवली
गावदेवीची पूजा म्हणजे मोठाच उत्सव
सोळा नगारे एका तालात एका सुरात एकदम बडवले जायचे
सोळा तुतार्या एकदम वाजायच्या
आसमंत त्या अनोख्या नादमय तालाने भरून गेला
या निमित्ताने सरूबाईला बेभान होऊन नाचायची मोहोलत मिळाली
देवीसमोर बेभान होऊन नाचण्याला तिथले स्थानीक लोक श्रद्धेने नाचणं समजायचे
त्यामुळे सरूबाईला आडवणारे कोणीच नव्हते
नदीकाठी घुटमळणार्या परदेसी बाबूला तो देवळात वाजणार्या अनाहत ताल खुचून घेऊन आला
आपण कधी ती गावाची अवघड वाट त्या अंधारात तुडवली त्याला समजलच नाही
तो मंतरल्या सारखा पोहोचला तो त्या देवीच्या पटांगणातच
उंचा पुरा आडव्या हाडाचा राजबिंडा तो शहरी बाबू गावकर्याना देवीचा प्रेशीतच वाटला
नियमानुसार देवदूत समजून त्याचं मनोभावे स्वागत झालं
रीतीनुसार त्याच्या गळ्यात सुगंधीत राम्नफुलांची माळ घालून त्याला मिरवण्यात आलं
अगदी ऐन पुजेच्या वेळी तो देवीसमोर इतक्या अंधारात प्रगट झाला हेच त्या मागचं कारण होतं
साधी भोळी माणसं त्यांच्या साध्या भोळ्या समजुती
रीतीनुसारच त्याला देवीशेजारी उच्चासनावर बसवून काय हवं ते मागण्याची विनंती केली
देवीचा खजिना हिरे माणकानी भरला होता
आणि स्वत: अर्धपोटी राहून गावकर्यानी तो पिढ्यांपिढ्या जपला होता
तो त्याच्या समोर खुला करण्यात आला
तीन मुठीत मावेल इतका त्याला उचलायची मुभा होती
पण त्या खजिन्याकडे त्या परदेसी बाबूनी पाठ फिरवली आणि काही द्यायचच असेल तर सरूबाईचा हात मागितला
एकच जल्लोश झाला
पारंपारीक वेश त्याला धारण करायला लाऊन दोघांचा पारंपारीक पद्धतीने तात्काळ विवाह लावणयात आला
आणि साश्रू नयनाने सरूबाईची त्या पाहुण्याबरोबर पाठवणी करण्यात आली
रीतीनुसार सगळा गाव नदीपर्यंत सोडायला आला
नदी पार केल्यावर त्या पाहुण्याने सांगितलं
हा विवाह मी तुझ्या गाववाल्यांच्या समजुतीसाठी केला, नाहीतर त्यानी तुला माझ्या बरोबर शहरात पाठवलं नसतं
पण मी तुला सोबत नेतोय ते तुझ्या नृत्य्कलेच्या नैपुण्यापायी
फार सुंदर नाचतेस, खूप मोठी कलाकार होशील
दिसायलाही सुंदर आहेस वाटलं तर चित्रपटातही नाव कमावशील
मी तुला या बंधनातून मुक्त करतोय
मुळात मी असं रुढीनुसार आलेलं बंधन मानतच नाही
तिला हा मोठा धक्काच होता
ती म्हणाली म्हणजे आपल्यात काहीच नाही?
तो म्हणाला आहे पण ते बंधन नाही, तुझी अडवणूक नाही,
मी तुझा आधार व्हायला तयार आहे, पण माझी पत्नी म्हणून जगण्यापेक्षा तू नामवंत कलाकार म्हणून जग
माझं नाव लावण्यात धन्यता मानण्यापेक्षा स्वत:चं नाव मोठं कर
मला त्यात जास्त आनंद आहे
दोघे शहरात आले तो तिला आपल्या घरी घेऊन गेला
त्याच्या प्रेमळ आईला दाराशी उभा असलेला जोडा बघून आईला काय ते समजलं
तो म्हणाला आई तू समजतेस तसं काही नाही
आई म्हणाली तू गप्प रहा तुला काही समजत नाही हे मी जाणून आहे
हळदीच्या पावलानी आलेल्या लक्ष्मिला असं दाराशी खोळंबत ठेवतोस?
तो म्हणाला आई ही इथे मोठी कलाकार व्हायला आली आहे
मग? होऊदेत की, माझी कुठे ना आहे
कला ही मनाने जोपासायची असते मनाने तिला पुजायचं असतं त्यासाठी मन स्थीर आणि निर्धास्त हवं
त्यासाठी स्थिरता हवी आणि स्थिरता घरामुळेच मिळते
उगीच उदात्त विचार करत स्वत:ला फसवू नकोस
लग्न झाल्यावर नवरेगिरी चालवू नकोस म्हणजे झाल
मग काय ,दोघांचं पून्हा शहरात त्यांच्या पद्धतीने लग्न झालं
हिर्याला पैलू पाडण्याचं काम त्याच्या आईनेच केलं कारण ती स्वत: नृत्यांगना होती
तिच्या तालमी खाली सरूबाईची सरोजादेवी झाली
जुळ्या मुली झाल्या
गावाला जाणं येणं होतच
एकदा ती तिच्या आई वडीलाना आणि एक दोन सख्याना आपल्या शहरातल्या घरी घेऊन आली
बघतात तो काय तिच्या बंगल्याचं लोनही तीरपं होतं
अगदी धामण गावच्या तिच्या चंद्र्मौळी घराच्या आंगणा सारखं एका बाजुला उताराला लागलेलं ...
पण धामण गावात राहणार्या सरूबाईच्या चंद्रमौळी घराचं आंगण खरच वाकडं म्हणजे उताराला लागलेलं होतं
सरूबाई त्या वाकड्या आंगणात बेभान होऊन नाचायची, कुठली कुठली लोकगीतं , पारंपारीक गीतं तिला त्यावेळी आठवायची, कुठला ताल आणि कुथले सुर ती शोधायची ते तिचं तिला माहीत
नाचताना आपण कसे दिसतो हे बघायला तिच्या घरी आरसाही नव्हता, पण तरी ती जरा सवड मिळाली की नाचायची आणि त्यावरून माय बापाच्या शिव्या खायची.. वंगाल लकशान इतकाच ताशेरा ते मारायचे
धामण डोंगर दर्यात विसावलेलं छोटसं गाव
अगदी मुठभर लोकसंख्या असलेलं , शहरी लोकांसाठी निसर्गरम्य,
नाहीतर तिथल्या लोकांच्या अडचणी समस्या त्याना माहीत, काबाडकष्ट आणि दारिद्र्य तर जन्माला पुरलेलं
कडे कपारी असल्यामुळे दिवस लवकर मावळायचा
चढ उतार असे की भले भले जेरीस यायचे
राजकिय लोकानी त्याला दुर्गम प्रदेश म्हणून अनेक योजना राबवल्या ज्या धामण पर्यंत पोहोचल्याच नाहीत
धामण गावापासून उतरायला लागलं की दोन तीन फर्लांगावर धामण नदी लागायची
भर पावसात दुथडी भरून वाहणारी नदी बाकीचे दिवस झूळू झुळू वाहती असायची
भारी मधुर पाणी होतं त्या नदीचं
शहरी प्रदुशणाचा स्पर्श त्या पाण्याला झाला नव्हता, कुठेही थांबावं आणि ओंजळीत पाणी घेऊन पोट भरावं शहरी शीतपेयं झक मारली अशी चव होती त्या झुळू झुळू वाहणार्या पाण्याला
त्या पाण्यावरच तर हे मुठभर लोकांच आडगाव टिकून होतं
त्या गावची रीतच होती पाणी भरायला गावच्या मुलीबाळीच नदीवर यायच्या
तोच त्यांचा टाईपसही असायचा
अगदी पाण्यात डुंबण्याइतकं पाणी नेहमीच नसायचं
पण तरूण देह चिंब करण्याइतकं पाणी नक्कीच असायचं , बर्यापैकी एकांत असायचा
सगळ्या मुली मुलीच अशायच्या मुलं शेतावर राबत असायची
एकजात सगळे वरीचं नाहीतर कुळथाचं पिक घ्यायचे
सोबतीला ससे तीतर मिळाले तर जेवताना मेजवानी
मुली पाणी भरायला आल्या की बरेचदा सरूबाईला नाचायला सांगायच्या
ती खरी कलाकार होती
तिलाही समोर प्रेक्षक लागायचे, त्यांची दाद लागायची
सगळ्या टाळ्या नाहीतर मडकी वाजवून ताल धरायच्या आणि नवे नवे ठुमके शोधत सरूबाई यथेच्छ नाचून घ्यायची, तितकाच तिचा सरावही व्हायचा
घरी शिव्या पडायच्या, वेळ प्रसंगी आईचे धपाटेही बाप मधे पडायचा म्हणून सरूबाईचा मार वाचायचा
पण इथे सख्यांची कौतोकाची थाप पडायची
सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जायचा
परत रानावनाची आडवाट चढताना तिला शीण जाणवायचा नाही
पण एकदा मैत्रीणींच्या शाबसकी सोबत एका परदेसी बाबूची उस्फुर्त वाहवा ऐकायला आली
सगळ्याच मुली बावचळल्या
कोण कुठे शोधण्यापेक्षा त्यानी गावची वाट चढायला सुरुवात केली
कुणाची घागर भरलेली कुणाची तशीच
परदेशी लोकांची भिती तशीच पुर्वापार त्यांच्या मनात ठसव्लेली
जंगली जनावर परवडलं ते एकदाच फाडून खातं पण हे शहरी लोक लचके तोडत अर्धमेलं करतात अशा अर्थाची म्हण त्यांच्या गावात बोलली जायची
बाकी मैत्रीणींसोबत सरूबाईलाही पळावं लागलं
पण ती अनोळखी आवाजातली मधूर वाहवा तिच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली
ते कानात मनात सतत घुमत राहिली धस्स करत राहिली
आता दोन तीन दिवस नदीवर न जाण्याचा निर्णय मैत्रीणीनी घेतला जो तिला नाईलाजाने मान्य करावा लागला
पण तिच्या मनाला तो मान्य नव्हता
दोन दिवस तिने कसे बसे मनाशी झुंज देत काढलेपण तिसर्या दिवशी तिच्या मनानेच तोडगा काढला
निर्णय दिवसा न जाण्याचा होता
आपण रात्री जाऊ, तिच्या निर्णयावर तिच ठाम झाली
आणि नेमकी पुनवेच्या रात्री तिने नदीची निसरडी वाट उतरायला सुरुवात केली
चंद्राचा धवल टिपूर प्रकाश पडला होता, इतका की पाना फुलांच्या सावल्या ठळक झाल्या होत्या
वातावरणात गारवा होता
रानफुलांचा मादक सुगंध सर्वत्र भरून राहिला होता
रात्रीच्या निरव शांततेत नदीचा झुळू झुळू वाहणारा प्रवाह एक वेगळाच नाद धरून होता
पुनवेच्या रात्री गावची देवी सख्यांसह नदीवर स्नानाला येते अशी अख्यायिका होती
बघा! गावदेवी सुद्धा रात्रीची नदीवर एकटं यायचं धाडस करत नव्हती
पण सरूबाईला उन्मादच चढला होता
ती नदीवर आली वाहत्या पाण्यात तिने आपले पाय बुचकळले
त्या आवजाने हरणाची जोडी सावध झाली, मोराने मान उंचावून अंदाज घेतले, लांडोरी सावध झाल्या
तितराचा कळप भरारा उडून थोड्या अंतरावर जाऊन बसला
आणि हिने आपलं नृत्य सुरू केलं
त्या बरोबर बासरीचे सूर वातावरणात भरले ओसांडले दूरवर वाहिले इतके की गावात पोहोचले
ती नाचत होती तो शहरी बाबू बासरी वाजवत होता
तो चित्रकार होता तो छायाचित्रकार होता तो दिगदर्शक होता
आणि त्याआधी तो रसिक होता
आस्थे कदम कळत नकळत दोघं अवचित समोरा समोर आले
त्याचे सुर तिची खनक एकमेकाला भिडली
मग काय, दोघे भेटायला लागले कधी भाबळीच्या रानात तर कधी बोरीच्या घाटात
पुनवेला बासरीचे सुर घुमले म्हणजे शुभ संकेत म्हणून गावदेवीच्या देवळात पुजा ठेवली
गावदेवीची पूजा म्हणजे मोठाच उत्सव
सोळा नगारे एका तालात एका सुरात एकदम बडवले जायचे
सोळा तुतार्या एकदम वाजायच्या
आसमंत त्या अनोख्या नादमय तालाने भरून गेला
या निमित्ताने सरूबाईला बेभान होऊन नाचायची मोहोलत मिळाली
देवीसमोर बेभान होऊन नाचण्याला तिथले स्थानीक लोक श्रद्धेने नाचणं समजायचे
त्यामुळे सरूबाईला आडवणारे कोणीच नव्हते
नदीकाठी घुटमळणार्या परदेसी बाबूला तो देवळात वाजणार्या अनाहत ताल खुचून घेऊन आला
आपण कधी ती गावाची अवघड वाट त्या अंधारात तुडवली त्याला समजलच नाही
तो मंतरल्या सारखा पोहोचला तो त्या देवीच्या पटांगणातच
उंचा पुरा आडव्या हाडाचा राजबिंडा तो शहरी बाबू गावकर्याना देवीचा प्रेशीतच वाटला
नियमानुसार देवदूत समजून त्याचं मनोभावे स्वागत झालं
रीतीनुसार त्याच्या गळ्यात सुगंधीत राम्नफुलांची माळ घालून त्याला मिरवण्यात आलं
अगदी ऐन पुजेच्या वेळी तो देवीसमोर इतक्या अंधारात प्रगट झाला हेच त्या मागचं कारण होतं
साधी भोळी माणसं त्यांच्या साध्या भोळ्या समजुती
रीतीनुसारच त्याला देवीशेजारी उच्चासनावर बसवून काय हवं ते मागण्याची विनंती केली
देवीचा खजिना हिरे माणकानी भरला होता
आणि स्वत: अर्धपोटी राहून गावकर्यानी तो पिढ्यांपिढ्या जपला होता
तो त्याच्या समोर खुला करण्यात आला
तीन मुठीत मावेल इतका त्याला उचलायची मुभा होती
पण त्या खजिन्याकडे त्या परदेसी बाबूनी पाठ फिरवली आणि काही द्यायचच असेल तर सरूबाईचा हात मागितला
एकच जल्लोश झाला
पारंपारीक वेश त्याला धारण करायला लाऊन दोघांचा पारंपारीक पद्धतीने तात्काळ विवाह लावणयात आला
आणि साश्रू नयनाने सरूबाईची त्या पाहुण्याबरोबर पाठवणी करण्यात आली
रीतीनुसार सगळा गाव नदीपर्यंत सोडायला आला
नदी पार केल्यावर त्या पाहुण्याने सांगितलं
हा विवाह मी तुझ्या गाववाल्यांच्या समजुतीसाठी केला, नाहीतर त्यानी तुला माझ्या बरोबर शहरात पाठवलं नसतं
पण मी तुला सोबत नेतोय ते तुझ्या नृत्य्कलेच्या नैपुण्यापायी
फार सुंदर नाचतेस, खूप मोठी कलाकार होशील
दिसायलाही सुंदर आहेस वाटलं तर चित्रपटातही नाव कमावशील
मी तुला या बंधनातून मुक्त करतोय
मुळात मी असं रुढीनुसार आलेलं बंधन मानतच नाही
तिला हा मोठा धक्काच होता
ती म्हणाली म्हणजे आपल्यात काहीच नाही?
तो म्हणाला आहे पण ते बंधन नाही, तुझी अडवणूक नाही,
मी तुझा आधार व्हायला तयार आहे, पण माझी पत्नी म्हणून जगण्यापेक्षा तू नामवंत कलाकार म्हणून जग
माझं नाव लावण्यात धन्यता मानण्यापेक्षा स्वत:चं नाव मोठं कर
मला त्यात जास्त आनंद आहे
दोघे शहरात आले तो तिला आपल्या घरी घेऊन गेला
त्याच्या प्रेमळ आईला दाराशी उभा असलेला जोडा बघून आईला काय ते समजलं
तो म्हणाला आई तू समजतेस तसं काही नाही
आई म्हणाली तू गप्प रहा तुला काही समजत नाही हे मी जाणून आहे
हळदीच्या पावलानी आलेल्या लक्ष्मिला असं दाराशी खोळंबत ठेवतोस?
तो म्हणाला आई ही इथे मोठी कलाकार व्हायला आली आहे
मग? होऊदेत की, माझी कुठे ना आहे
कला ही मनाने जोपासायची असते मनाने तिला पुजायचं असतं त्यासाठी मन स्थीर आणि निर्धास्त हवं
त्यासाठी स्थिरता हवी आणि स्थिरता घरामुळेच मिळते
उगीच उदात्त विचार करत स्वत:ला फसवू नकोस
लग्न झाल्यावर नवरेगिरी चालवू नकोस म्हणजे झाल
मग काय ,दोघांचं पून्हा शहरात त्यांच्या पद्धतीने लग्न झालं
हिर्याला पैलू पाडण्याचं काम त्याच्या आईनेच केलं कारण ती स्वत: नृत्यांगना होती
तिच्या तालमी खाली सरूबाईची सरोजादेवी झाली
जुळ्या मुली झाल्या
गावाला जाणं येणं होतच
एकदा ती तिच्या आई वडीलाना आणि एक दोन सख्याना आपल्या शहरातल्या घरी घेऊन आली
बघतात तो काय तिच्या बंगल्याचं लोनही तीरपं होतं
अगदी धामण गावच्या तिच्या चंद्र्मौळी घराच्या आंगणा सारखं एका बाजुला उताराला लागलेलं ...
Uttam !
ReplyDeleteनेहमीपेक्षा वेगळी कथा
ReplyDeleteSurekh....👌👌
ReplyDelete