Posts

Showing posts from March, 2018

महाबली

रामानंद सागर  यांच रामायण दूर्दर्शनवर झळकलं आणि उंबर गाव, बोर्डी यासारखी आडवाटेला असलेली गावं अचानक चर्चेत आली, भिल्लोरी सुद्धा असच गाव , जेमतेम सत्तर पंचाहत्तर उंबरठा असलेलं , समुद्रकिनारी वसलेलं  तरी निसर्गरम्य म्हणता येणार नाही कारण तसं ओसाडच पण या बाकीच्या गावांमुळे हे गावही जरा लक्षात यायला लागलं कारण त्याकाळी मालिकांची  शुटींग्ज अत्ता सारखी चोवीस तास सुरू नसायची सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ही ठरलेली वेळ, सहाचे साडेसहा व्हायचे पण सात व्हायचे नाहीत त्यात विजेचा लपंडाव सुरूच असायचा, दिवे गेले की हातावर हात ठेऊन बसायचं मग युनीटमधली काही हौशी माणसं आजुबाजुच्या प्रदेशात फेरफटका मारून यायची , तर अशा फेरफटक्यात भिल्लोरी गावाचा शोध लागला, गुजराती मराठी मिक्स अशी काहीतरी भाषा हे लोक बोलायचे बोलायला  असायचं कोणं म्हणा, दिसायला घर दिसायची पण एकजात सगळी बंद , दोन पिंपळाचे पार होते तिथे मात्र जरा वर्दळ असायची समिद्रकिनारी एक  खडकाचा सुळका होता त्याला हे लोक फार  मानायचे, स्वयंभू शिवलींग समजायचे नात्यावर छत होतं ना चौथरा पाऊस पदेल तेंव्हा सुळक्याला अभिषेक व्हायचा एरव...

सुखाचा आलेख

आलेख हा श्ब्द जितका परिचयाचा तितका कठीण , मी तर त्याच्यापासून चार हात लांबच होतो पण तरी वाकप्रचारात का होईना हा शब्द येतोच अगदी प्रगतीचा आलेख , सुखाचा आलेख  वगैरे वगैरे तर  श्री. मनोहर शंकर दातार या साठी कडे झुकलेल्या सदगृहस्थाच्या सुखाचा  आलेख मांडला तर तो एक  यशस्वी कर्त्या कर्तबगार पुरुषाचा आदर्शच ठरेल, आणि ठरलाच आहे काही वर्ष नोकरी करून त्यानी व्यवसायात झोकून दिलं आणि टक्कर देत दहा वर्षात आपला वर्षाचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात नेला , सुस्वरूप बायको, दोन लोभस सदगुणी मुली त्याही कर्तबगार, जावईही अगदी मनाजोगते लाखोमें एक म्हणतात तसे,  गेल्या एक दोन वर्षात एक दोन महत्वाचे पुरस्कार सुद्धा त्याना मिळाले अर्थात ते ही भाकीत शंकर दातारानी आधीच मांडून ठेवलं होतं त्यांचे वडीलच स्वत: उत्तम पत्रिका बघायचे आणि मांडायचे सुद्धा आपल्या आपत्यांची जन्मकुंडली पित्याने मांडू नये असा एक अलिखित नियम काही प्रांतातले ज्योतिशी मानतात हे पण त्यातलेच पण त्यावर त्यानी एक मार्ग शोधला आपल्या  साडवालाच त्यानी आपल्या तिनही अपत्यांची जन्मवेळ घेऊन यायला सांगितलं ... असं करून त्यानी ...

कोंडी

ती दिसल्यावर त्याने न पाहिल्यासारखं केलं तिने सुद्धा तो दिसल्यावर न दिसल्यासारख्ं केलं खरं तर एकमेककाडे न बघता  दोघाना एकमेकाचा अंदाज घ्ययाचा होता पण एकमेकाना बघून भेटून अगदी  खेटून बसल्यावर सुद्धा दोघाना एकमेकाचा अंदाज आला नव्हता मग आता इतक्या  दिवसानी अचानक दिसल्यावर कसा अंदाज बांधायचा? अंदाज बांधायचा म्हणजे नुसता मनाचा खेळ मनाचा खेळ म्हणजे एकतर्फी मन आपल्याशी खेळत राहतं , आणि आपण? निव्वळ विनाकारण सोसत राहतो ते दोघानाही मान्य नव्हतं दोघानी रस्ता क्राँस केला ,पून्हा दोघं समोरासमोर आले मग दोघाना राग आला स्वत:चा? की समोरच्याचा? पण रागापायी हसू आलं ,दोघानाही ते ही एकदम मग हसायला काय झालं ? हे विचारणं गरजेचं होऊन बसलं तिने धिटाईने पुढाकार घेत विचारलं हसायला काय झालं? त्याने नरमाईने विचारलं तुला रुसायला काय झालं ? ती म्हणाली हे तेंव्हाच का नाही विचारलस? तो म्हणाला तेंव्हा मी पण रागावलो होतो मग काय, आता राग गेला? तुझा रुसवा गेला? ती गप्पच बसली , तो ही गप्प बसला दोघे जागीच थांबले भर रस्त्यात भर  गर्दीत असं जागीच थांबून चालत नाही एक तर धक्के खावे लागतात नाहीतर त्रासीक सल्...

शुभमंगल

एकवीस मार्च उजाडणार म्हंटल्यावर गेली बारा वर्ष झाली मी फारच बेचैन होतो.. मै किसिको मूह दिखानेके काबील नही रहाँ असं हिच्या धाकाने म्हणत नाही इतकच  माझी तशी काही चूक नसताना ही बोच मला लागून राहीली अहे हो ... तसा मी साधा सरळ माणूस नाका समोर बघून चालणारा(नशिबाने नाकही सरळ आहे,मोठ असलं तरी)मग नक्की झालं काय?  काही नाही हो लग्नाचा मौसम होता एका लग्नाचं निमंत्रण होतं... आहेर द्यायचा होता की नाही आठवत नाह ी.. कारण जे आठवतय तेच इतकं भयंकर आहे की... मला लग्नाला जायचं म्हणजे जेवायला जायचं इतकच माहीत पण ही म्हणाली मूहूर्त महत्वाचा... आपल्या हाताने वर वधूच्या डोक्यावर अक्षता पडायलाच हव्यात... म्हणून मुहूर्त साधून हाँलवर पोहोचलो तर तिथे अक्षता वाटायची नवीनच पद्धत दिसली मूठभर अक्षता हातात देऊन एकदाचं मोकळं व्हायचं की नाही? तर नाही !क्रेपच्या नाजूक गुलाबी केशरी कागदात अक्षतांची पूडी बांधली होती भरीस भर म्हणून हळदीत बुडवलेल्या धाग्याने ती पूडी बांधलेली होती मुळात मला सा~~वधा~~न या शब्दावर अक्षता टाकायचं टेंशन असतं खर सांगू का? टेंशन हा माझा कायम मेन प्राँब्लेम राहिलाय शाळेत असताना कवायतीच्य...

पाडवा

काही बातम्या कनात कुजबुजल्या की त्यांचं महत्व वाढतं, गांभिर्य मनावर ठसतं असा ठाम समज अहे म्हणूनच गुड्डीचं लग्न मोडलं हे दादरकर बाई अगदी उमाच्या कानाशी बसून सांगत होती... याला झाली असतील दोन अडीच तीन वर्ष... पण तो दादरकर बाईंचा अविर्भाव आणि उमाचा झालेला चेहरा मी कधी विसरू शकत नाही.. उमा लग्न होउन आली तेंव्हा गुड्डी असेल अशीच तीन वर्षांची तिला मी बुढ्ढी म्हंटलं की तिला खूप राग यायचा.. लहानपणापास ून तिला दांडगी समज.. एक सिक्रेट होतं तिला दात उशीरा आले आणि अजून दोन दातांचा तर पत्ताच नव्हता शेवटी छोटी सर्जरी करून त्या दाताना अवतिर्ण होण्यास मदत करवी लागली म्हणून मामा आपल्याला बुढ्ढी म्हणतो इतक्ं त्या लहान जिवाला कळायचं पण मामीच्या गळ्यात पडून भोकाड पसरलं की मामी मामाला खोटं खोटं रागवते हे तिला कळायचं नाही पण उमा म्ह्णते मी खोटं रागवायचेच नाही मुळी.. मला खरच तुमचा राग यायचा बाहुली सारखी गोड मुलगी तिला काय बुढ्ढी म्हणायच? आणि पाटणकरांची ही धाकटी बया होती मात्र खरच गोड.. आणि गोड मुलीची सूंदर मुलगी कधी झाली हे आम्हाला कळलच नाही आम्ही जितकी घरं बदलली तितक्या घरात ही बया राहून गेली आणि या ना त्...

संदर्भ...

लग्नसराईचे दिवस असले की मला लग्नसराईतच खेळला जाणारा एक खेळ आहे हम आपके हैं कौन या चित्रपटामुळे तर तो फारच तेजीत आला होता जमलेले नातेवाईक कोंडाळं करून बसतात, एक जण वाद्य वाजवायला बाहेर बसतो आणि कोंडाळ्यात एक वस्तू याच्या हातातून त्याच्या हातात फिरत असते, मधेच ते वाद्य थांबतं मग  तेंव्हा ज्याच्या हातात वस्तू राहील त्याच्यावर राज्य.. राज्य म्हणजे सत्ता नाही, राज्य म्हणजे शिक्षा मग जी फर्मावली जाईल ती शिक्षा मान्य करायची... मजा असते , मूड असतो , बुरा ना मानो होली है सारखं मग त्यात काहीही खपून जातं पण  सौ  आसावरी दाभोळकर या मध्यमवयीन स्त्री ने मात्र या खेळाला वेगळाच रंग आणला आसावरी दाभोळकर दोन मुली एका मुलाची आई, चंद्रकांत दाभोळकरांची पत्नी चंद्रकांत क्लास वन अधिकारी, स्वभावाने उमदे, दिसायला राजस,आसावरी पण काही कमी नव्हती दिसायला सूंदर वागायला सालस हाताने सुग्रण पण तरी चंद्रकांत कायम उजवे ठरले त्याबद्दल तिची काहीच तक्रार नव्हती आसावरी माहेरी सगळ्यात मोठी धाकटे तीन भाऊ तीनही भावाना आपली ताई म्हणजे जीव की प्राण अर्थात  तिघांच्या बायकाही आपल्या मोठया नणंदेला मनापा...

पन्नाशी

आज आमची कुंती पन्नास वर्षांची झाली,  तिला शुभेछ्चा देताना तिच्या आईचही अभिनंदन केलं तर अगदी खाजगीत सांगावं तशी म्हातारी माझ्याशी बोलायला लागली म्हणाली अरे ही कुंती माझी तिसरी मुलगी , निव्वळ मुलासाठी परत चांस घेतलेला.. मुलगाच हवा म्हणून घरात दोन मोठ्या पुजा सासूबाईनी करवून घेतलेल्या... काय तो पुजेचा थाट काय तो पसारा ... पण हिनं कुणाला जुमानलं नाही आली आपल्या बहिणींचा मागोवा घेत खरं सांगते हिला कुशी त घेऊन मी खूप रडले.. तिसरी मुलगी झाली म्हणून नव्हे तर ही कुशीत असल्याचा आनंद मी उघडपणे व्यक्त करू शकत नव्हते...ही झाली ना तर माझ्या कडे टुकूर टुकूर बघत बसली होती जणू जुनी ओळख शोधत होती मी तेंव्हाच बाळाला वचन दिलं काय बोलणी ऐकायची आहेत ती मी ऐकेन तुझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही माझ्या भरवशावर तू निर्धास्त रहा जशा तुझ्या दोन मोठ्या बहिणी माझ्या कुशीत निवांत आहेत तशी तू ही निवांत हो आणि खरच रे ही गद्धी पहिले सहा महिने निव्वळ झोपून होती बघावं तेंव्हा बाळ आपलं झोपलेलं दुधासाठी सुद्धा मी उठवायचे म्हणून... पालथं पडणं नाही कुशीवर वळणं नाही.. कानाशी नगारा वाजवा काही फरक नाही कितिदा मी हिला उ...

जोशी काका

वीणा मावशी गेल्यापासनं दर रविवारचा नाष्ता करायला जोशी काका आमच्याकडे यायला लागले. उमा घरी असेल तर बरेचदा दुपारचं जेवण सुद्धा, मग दुपारची झोप्मग संध्याकाळचा चहा झाला की आम्ही फिरायला बाहेर पडायचो,  जोशी काका रात्रीचे जेवायचे नाहीत,मग त्याना घरी सोडून येताना कुल्फीचा कार्यक्रम ठरलेला,  आधी एक कुल्फी, मग एकाने काय होतय म्हणून दुसरी आणि आग्रहाची तिसरी .. सगळं कसं ठरून गेल्यासारखं . त्यात हल्ली सुधारणा म्हणजे पुढच्या रविवारी काय कर हे काका  रविवारी घरी निघताना सांगायचे.... त्यात बरेचदा अप्पे कर हे टुमणं असायचच, आणि अप्पे केले की वीणाच्या हातचे अप्पे  काही औरच हे वाक्य ठरलेलं पण सध्या ग्रील्ड सँड्विचचा जमाना होता , काय करू विचारलं की ग्रील्ड सँडविच कर हे ठरलेलं म्हणून  या  म्हनजे मागच्या रविवारी उमाने विचारलच नाही काय करू? न विचरताच दाल ढोकलीचा बेत आखला, दाल ढोकलीला दोनदा उकळी आली पण आज काही जोशी काकांचा पत्ता नाही तरी आम्ही वाट बघायला सुरुवात केली नाही होऊ शकतो कधीतरी उशीर , अगदी वक्त के पाबंद असले म्हणून काय झालं ? आपली सत्तरी उलटली हे त्याना मान्य  नसलं म...