Posts

गोलू म्हणजे गोड

सोनाली सारख्या गोड मुलीला गोलू हे नाव कसं पडलं कोणजाणे.. पण ज्या मोजक्या मंडळीना तिला गोलू हाक मारायचा अधिकार आहे त्यात आम्ही दोघे येतो.ती आमची लाडकी आहे म्हणून सांगत नाही, पण आमची गोलू खरच गोड आहे, उमाच्या शब्दात सूंदर आहे जरा तोंडावर ताबा ठेवला तर तिच्यात अजूनही फरक पडेल पण तसा फरक पडण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाही. कारण एकटी उमा बोलून बोलून किती बोलणार?  तिच्या घरी तिचे पप्पा जी बोलतील ती पूर्व  दिशा धरली जाते पण ते घरी असतात कुठे? आजी आहे जी गोलूला सकाळी नऊ वाजता सुद्धा उठवताना तिच्या अंगावर अजून एक चादर घालते. अजूनही ती महतप्रयासाने उठल्यावर तिला भिजवलेले बदाम खायला घालते. पप्पाना आपल्या बिझनेस मधून डोकं वर काढायला वेळ नाही. याचा अर्थ त्याना आपल्या गोलूची काळजी नाही असं नाही. पण तिच्या भविष्याचा विचार त्यानी आधीच करून ठेवलाय. त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात प्रताप धारगळकरशी तिचं लग्न पक्कं ठरवलय.हे गोलूला माहीत नाही असं नाही. पण वेळ आली की बघू असा गोलूचा संथ अँटिट्युड आहे. उगाच अत्ता पासून कशाला पप्पांसारख्या हटवादी माणसाशी दोन हात करा? असा तिचा सवाल आहे. उमाला म्हणूनच...

मुद्दा

 घाईघाईने प्रोफेसर  काँलेजात शिरत होते, तर गेटवरच  वाँचमनने हटकलं काय सर, वहिनी नाहीयेत वाटतं घरी? ते थबकले जरा वैतागले सुद्धा, याला काय करायचय? असं मनात  म्हणत असताना त्यानी  आपलं लक्षच नाही असं दाखवत सायकल  स्टँडला लावली, आणि ते  आत जायला  वळले.. तरी वाँचमनने पाठ सोडली नाही वहिनी नाहियेत का घरी? कशा वरून? तुम्हाला आज यायला दहा मिनिटं उशीर झाला आणि जेवणाचा डबा पण दिसत नाही प्रोफेसर एकदम चमकले , खरच आज आपला डबाही राहिला आणि  सकाळची न्याहरीही, त्यानी खिसा चाचपडला खिशात नेहमीची गोळीही नव्हती वाँचमनला काही उत्तर न देता  ते इमारतीकडे वळले.. ग्राऊंड पार करत असताना आज  उशीर? आज   उशीर? हे त्याना किमान दहावेळा ऐकावं लागलं खरच गेल्या बावीस वर्षात  बोटावर मोजण्याइतकया वेळाच त्याना उशीर झाला होता पण त्या मागची कारणं ही तशी होती पण आजचं कारण? बायको भांडून माहेरी गेली म्हणून उशीर? ते ही या वयात? लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर? एकुलत्याएका मुलीचं लग्न झाल्यावर? लग्नात पाठवणीच्या वेळी बबी अगदी गळ्यात पडून मुसमुसत म्हणाली ह...

नं संपणारी गोष्ट

 मला गणीतातलं फारसं कळत नाही, पण तरी लक्षात राहिला तो हच्चा जो  गरजेपुरता घ्यायचा असतो आणि गरज सरल्यावर परतही करायचा असतो नाहीतर हिशोब गडबडतो तसेच आपल्या लहानपणातही काही हच्चे असतात जे गरजे पेक्षा  जास्त आणि बरेचदा गरज नसताना आपल्यात लुडबुडतात आणि ते हच्चे म्हणजे आपल्या न कळत्या वयात आपली ज्यांच्याशी तुलना केली जाते अशी आदर्श मुलं  जी लवकर उठतात, भर भर आवरतात दुध प्यायला खळखळ करत नाहीत त्यांचे पाढे पाठ असतात, गृहपाठ पूर्ण करून ते रोज मनाचा जास्त अभ्यास करतात रोज पाच ओळी शुद्धलेखन खळ खळ नं करता लिहितात, विना तक्रार डोक्यावर तेल थापून घेतात, घरच्यानी केस कापायला सांगितले की  तत्परतेने केस कापून घेतात तो बघ कसा म्हंटलं की कोणी नंसांगता त्या परफेक्ट मुलाची छबी आपल्या डोळ्यासमोर जरा जास्तच आकारमानासह उभी राहते आमच्या लहानपणी तो बघ कसा हे वाक्य कानावर आलं की आमच्या आळीतल्या समस्त मुलांच्या डोळ्यासमोर तुळपुळ्यांचा उमेश उभा राहयचा रमाकांत तुळपुळ्यांचा हा चिरंजीव, तसा नवस सायास करून प्रतिक्षा करायला लाऊन  झालेला लहानपणापासूनच  कांताकानी त्याला शिस्तीत वा...

पराधीन

जयश्रीचं दार हल्ली बंदच दिसतय आधी लक्ष गेलं नाही, आणि लक्षात आल्यावर सारखच लक्ष जायला लागलं ही अशी नं सांगता कुठे जात नाही फोन केला तर फोन बंद , आणि शेजारी कुणाला विचारायची सोयच नाही कारण जयश्रीचा शेजार्‍यांशी फारसा संबंध नाही त्याला कारणही तसच आहे, आमच्या जयश्री बद्दल बरेच गैरसमज आहेत  आणि त्यात तसं तथ्यही आहे हो! म्हणजे जयश्रीचे तिच्या मोठ्या मेव्हण्याशी संबंध आहेत इन अ रिलेशनशीप म्हणतात तसे पण म्हणून काही आम्ही जयश्रीला दोषी समजत नाही तिची कथाच तशी आहे जयश्री आणि मनोरमा दोघी बहिणी, जयश्री पेक्षा मनोरमा पाच वर्षानी मोठी इतकाच फरक नाही तर मनोरमा रुपाने लावण्यवती, अप्रतीम सौंदर्‍याचा उत्कृष्ट नमुना हेच सौंदर्य बिचारीला घातक ठरलं हे जे काही नातेवाईक असतात ना! बोलू नये पण कळत नकळत बरेचदा ते तुमच्या आयुष्यात नको इतकी ढवळा ढवळ करतात लहानपणापसून जयश्रीला या मनोरमाच्या सौंदर्‍यामुळे विनाकारण अवहेलना सोसावी लागली अगदी मनोरमा महाराणी तर जयश्री तिची दासी म्हणण्या इतपत मजल गेली होती पून्हा हे सगळं मजेत जयश्री मुळातच समंजस त्यात तिला तिच्या शाळेतल्या बाईंचा आधार बाईंंमुळे जयश्री अनेक उपक्रमां...

ओळख

कधी नव्हे ते आई घाई करत होती, पाणी लवकर जातं बाबा लवकर निघतात आईलाही कामला बसायचं असतं त्याच्या आधी केरवारे पुजा पोथी उरकायची असते हे तसं दोघांच्या सवयीचं होतं त्यासाठी मुलांच्या मागे लागायची गरज नव्हती पण तरी आई दोघाना आटपा भराभर आटपा भराभर करत होती आई काय झालय शेवटी मुलानी विचारलच.. पोह्याची तयारी केली आहेस शेव सुद्धा आणलीस जाऊन आई म्हणाली काही नाही रे पोरानो माझी एक बालपणीची मैत्रीण येणार आहे म ला भेटायला काल तिने तिच्या ड्रायव्हरच्या हाती निरोप धाडला होता तिच्या समोर वेडेपणा करायचा नाही शाहण्यासारखं वागायचं आपल्या बारा तेरा वर्षांच्या मुलाना ती आई सांगत होती आहे त्यात आपलं छोटसं घर आवरत होती ठेवणीतली चादर तिने पलंगावर अंथरली... जुनं एक जाजम होतं ते जमिनीवर पसरलं रात्री पलंगावर बाबा झोपत असले तरी दिवसा पाहुणे आले तर त्यांची उठबस पलंगावरच व्हायची पालंगा खालची अडगळ दिसू दिली तर साधे नेहमीचे पाहुणे आणि ती अडगळ लपवायचा प्रयत्न केला तर कोणीतरी खास पाहुणे हे आता मुलानाही माहीत झालं होतं , अत्ता सुद्धा आई ती अडगळ लपवायच्या मागे लागली होती कधी नाही ते तिने स्वैपाकघराच्या दारचा मधला पडदाह...

जागरुक

कोपरगावला आमच्या विजीमावशीच्या अंगणात कदंब वृक्षाच्या ढोलीत गजाननाने आपलं रूप साकारलं होतं ही गोष्ट साधारण पन्नास वर्षांपुर्वीची, तेंव्हा मावशीचे यजमान आणि मोठे दीर मुंबईत एका नामांकीत डाँक्टर म्हणून ओळ्खले जात होते पण मुलं लहान आणि थकलेल्या सासूबाई म्हणून विजीमावशी जाऊबाईंसबोत कोपरगावातच राहीली होती, मावशीला चार मुलं आणि जावेला सहा, धाकटी दोन जुळी होती घरचा व्याप खूप पण तरी विजीमावशीचे उपास तापास  व्रतं वैकल्य सुरूच असायचं तर अशा घराच्या अंगणात श्री गजाननाने रूप धारण केलं होतं जरा निरखून बघितल्यावर मावशीला चार हात असलेलं लंबोदराचं प्रसन्न रूप स्पष्ट दिसलं म्हणजे जाणवलं नशिबाने मावशीचे यजमानही तेंव्हा घरीच होते, त्यानी बघून खात्रीने सांगितल्याशिवाय मावशीचं समाधान झालं नसतं म्हणून मावशी दूपरची जेवणं होईपर्यंत थांबली आणि दूपारचे सगळे लवंडल्यावर ती हळूच यजमानाना म्हणाली जरा बागेत येता ? मला काहीतरी दाखवायचय त्याना वाटलं परत गोड बातमी आहे की काय? त्यानी साशंक स्वरात विचारलं सगळं ठीक आहे ना? मावशी लाजत म्हणाली तुमचं आपलं काहीतरीच काका निर्धास्त होत म्हणाले काहीतरी असल्याशिवाय तुम्ही...

महिरप

तो घराची किल्ली आज न्यायची विसरला आणि नेमका तिला आज यायला उशीर होणार होता तिन्हिसांजेला बंद  दाराशी जरा वैतागून बसल्यावर जरा वेळाने त्याला मनापासून आपलं घर पाठीशी उभं असल्या सारखं वाटायला लागलं तिची वाट बघता बघता तिचा राग यायच्या ऐवजी त्याला त्या दोघांच सवयीचं झालेलं नातं नव्याने उमगलं तिचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरत होतं,अत्ता सुद्धा ती फक्त आपलाच विचार करत असेल या विचाराने तो सुखावला आणि खंतावलाही, कधी कधी एकांतात आपल्याला स्वत:जवळ कबुली देणं सोपं जातं तसं त्याचं झालं आपण तिला फार गृहीत धरतो याची त्याला नव्याने जाणीव झाली आणि उगीचच बोच लागून राहीली.. लवकर ये भूक लागली आहे लवकर ये मला चीक चीक होतेय असे एक दोन मेसेज पाठ्वून झाले होते आता त्याने मेसेज केला सावकाश ये उगीच जिवाची तग मग करून येऊ नकोस आठच वाजतायत.. नेमका तो मेसेज तिला पोहोचत नव्हता त्याला उगाचच उत्साह आल्या सारखं झालं इतक्या दिवसात कधी घरा भोवतीच्या बागेत तो फिरला नव्हता साधं लक्षही द्यायला त्याला जमलं नव्हतं  हौस त्याची आणि मेहेनत तिची या तत्वावर ती घरा भोवतीची बाग फुलली होती, आनंत मोगरा, ...