Posts

Showing posts from May, 2018

लाकुडतोड्याची गोष्ट

काही गोष्टी कोणी नं ठरवता ठरून जातात आणि मग ठरल्याप्रमाणे घडत राहतात, कधी ठरवलं कोणी ठरवलं हे असले प्रश्र्न मग उरतच नाहीत जसं आई अनंताची लाखोली तेंव्हा  पार्लेश्वराला वाहयची त्यावेळी पिशवी पिशवी फुलं तुपे वहिनी घेऊन यायच्या छायाताई एकशे सोळा फुलं आहेत हो, सदुशष्ट फुलं मिळाली, या कळ्या आहेत उमलतील उद्याच्याला , जरा मोजून घ्या  हे असे संवाद अजून माझ्या कानात घुमतात त्यावेळी आमच्या इथे रानंच्या रानं माजलेली असायची अनंत चाफा प्राजक्त जांभूळ नागचाफा बकूळ किती झाडं सांगू? मग आमच्या आईचा नेम ठरलेला कधी प्राजक्ताची नाहीतर कधी अनंताची तगारीची लाखोली आई पार्लेश्वराला वहायची लाखोली वाहणं म्हणजे लाख लाख फुलं चातुर्मासात चातुर्मास पूर्ण व्हायच्या आत शंकराच्या पिंडीवर वाहणं , बेलीची लाखोली वाहणारे बरेच्जण असायचे गुंजा वाहणारे सुद्धा कोण कोण असायचे त्यावेळी गुंजेची गोमटी झाडं सुद्धा खूप होती आमच्या भोवती ,  एक गाव देवी होती तिचं नाव नीट आठवत नाही पण तिला करंज्याचा हजारा वाहयला जायचा , करंजा  म्हणजे करंजी नव्हे करंज्याचं हिरवगार तजेलदार झाड असायचं त्याला कडू जहार औषधी फळं लागा...

परंपरा

आमची शालमली आहे ना , तिच्या सासरी पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे मुलगी मोठी झाली की तिला एकटीला  दिवा घेऊन चैत्र गौरीला  गाव देवीच्या देवळात पाठवतात ते ही तिन्हिसांजेला आता ही त्या काळातली गावा गावात रुढ झालेली परंपरा त्यावेळी मुलगी मोठी होण्याचा अर्थही वेगळा होता , वातावरणही त्याला पोषक होतं गावं साधी त्याहून तिथली माणसं साधी तिन्हिसांजेला कोणी मुलगी एकटी नटून थटून दिवा घेऊन देवळाकडे निघाली की सगळ्याना समजायचं अमूक अमूक मुलगी उपवर झाली , मग कोणाचे कान टवकारायचे तर कोणाचे डोळे बारीक व्हायचे विचारणा व्हायची मग दर मौसमात चार दोन कार्य ठरायची त्याकाळी पंचक्रोशीतच स्थळं बघायची पद्धत, एकमेकाचं एकमेकाला माहीत असायचं कुणाकडे पूर्वापार चालत आलेलं वेड आहे, कुणी दाखवत असलं तरी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती कशी आहे कुणाचा मुलगा काय करतो आणि मुलगी गुणाने कशी आहे त्यामुळे पूर्वापार परंपरा असली , दरवर्षी नेमाने होत असली तरी त्यातला नवेपणा  कायम ताजा पण आता काळ बदलला विचार बदलले थोडक्यात माणसं बदलली पण मनातली श्रद्धा आहे ती नाही बदलत , खास करून आपल्या मुलाबाळांच्या बाबती...